Bal Gangadhar Tilak Biography in Marathi | बाळ गंगाधर टिळक यांचा जीवन परिचय | Speech on Lokmanya Tilak In Marathi

Bal Gangadhar Tilak Biography in Marathi | बाळ गंगाधर टिळक यांचा जीवन परिचय | Speech on Lokmanya Tilak In Marathi

बाळ गंगाधर टिळक यांचे जीवन, राजनीति, समाजकार्य आणि मृत्यू. Bal Gangadhar Tilak Biography, Political Career, Social Reforms and Death in Marathi.

Bal Gangadhar Tilak Biography in Marathi बाळ गंगाधर टिळक हे एक भारतीय समाज सुधारक आणि भारताला स्वतंत्र मिळवून देण्यांमधील एक प्रमुख क्रांतिकारी होते. आधुनिक भारतातील प्रमुख वास्तु विशारदांपैकी ते एक होते त्याचबरोबर स्वराज्य आणि स्व नियम चे सर्वात मजबूत समर्थक होते. त्यांनी दिलेला प्रसिद्ध नारा म्हणजेच “ स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच “ हा नारा भारताच्या स्वतंत्रता संघर्षामध्ये भविष्यातील क्रांतिकारकांसाठी फार प्रेरणादायी ठरला.

ब्रिटिश सरकारने त्यांना “ भारतीय अशांतीचे जनक “ म्हणून संबोधले आणि त्यांच्या अनुयायांनी त्यांना “ लोकमान्य ” ही उपाधी दिली ज्याचा अर्थ असा की ते लोकांद्वारे पूजनीय आहेत. लोकमान्य टिळक एक हुशार राजनीति तज्ञ तर होतेच त्याचबरोबर एक प्रखर विद्वान देखील होते, स्वतंत्रता ही राष्ट्राच्या उन्नतीसाठी खूप जास्त गरजेची आणि महत्त्वाची गोष्ट आहे असे त्यांचे स्पष्ट मत होते.
माझा आवडता छंद – वाचन

 

बाळ गंगाधर टिळक माहिती (Information Of Lokmanya Tilak In Marathi)

  • नाव (Name) –  बाळ गंगाधर टिळक
  • मूळ नाव (Real Name)- केशव गंगाधर टिळक
  • जन्म (Date of Birth)– 23 जुलै 1856
  • जन्म स्थान (Birth Place)– रत्नागिरी, महाराष्ट्र
  • वडिलांचे नाव (Father Name)– गंगाधर टिळक
  • आईचे नाव (Mother Name)-  पार्वती बाई
  • पत्नी चे नाव (Wife Name)– सत्यभामा बाई
  • पेशा (Occupation )– स्वतंत्रता सैनिक , समाजसुधारक
  • मृत्यु (Death)– 1 ऑगस्ट 1920
  • मृत्यु स्थान (Death Place)– पुणे, महाराष्ट्र.

 

बाळ गंगाधर टिळक यांचे प्रारंभिक जीवन. । Early Life Of Bal Gangadhar Tilak  In Marathi

  • केशव गंगाधर टिळक ( मूळ नाव ) यांचा जन्म 23 जुलै 1856 ला दक्षिण पश्चिमी महाराष्ट्राच्या एका छोट्याशा तट असलेल्या शहरात रत्नागिरीमध्ये एका मध्यमवर्गीय चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील गंगाधर शास्त्री रत्नागिरीमध्ये एक प्रसिद्ध संस्कृत विद्वान आणि शिक्षक होते. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई होते. त्यांच्या वडिलांच्या बदलीमुळे परिवारासोबत ते पुण्याला आले. त्यांच्या वडिलांच्या मृत्यूच्या आधी बाळ गंगाधर टिळक यांचे वय 16 वर्षे असताना त्यांचा विवाह सत्यभामाबाईशी झाला.
  • टिळक हे एक हुशार विद्यार्थी होते, त्यांचा स्वभाव साधा आणि सरळ होता. अन्यायाविरुद्ध त्यांचा असहिष्णू पवित्रा नेहमी असायचा आणि कमी वयापासूनच त्यांचे स्वतंत्र विचार होते. बाळ गंगाधर टिळक यांनी 1877 मध्ये संस्कृत आणि गणितात पुण्याच्या डेक्कन कॉलेज मधून आपली पदवी पूर्ण केल्यानंतर गव्हर्मेंट कॉलेजला, बॉम्बेमधून 1879 मध्ये एल एल बी ची डिग्री प्राप्त केली. आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुण्याच्या एका शाळेमध्ये इंग्रजी आणि गणित विषय शिकवायला सुरुवात केली.
  • शाळेतील अधिकाऱ्यांसोबत न पटल्यामुळे त्यांनी 1880 साली शाळेमध्ये शिकवणे सोडून दिले आणि राष्ट्रवादीवर जोर दिला. आधुनिक कॉलेजचे शिक्षण प्राप्त करणाऱ्या भारताच्या पहिल्या पिढीमधील ते एक होते. टिळकांनी इंग्रजांच्या शिक्षा प्रणालीचा कठोर अपमान केला. त्यांनी ब्रिटिश विद्यार्थ्यांच्या बदल्यात भारतीय विद्यार्थ्यांवर होणाऱ्या भेदभावाचा कडाडून विरोध केला. टिळकांच्या मते, जे भारतीय त्यांच्या उत्पत्तीबद्दल अनभिज्ञ राहिले त्यांच्यासाठी शिक्षण पुरेसे नव्हते. भारतीय विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रवादी जागवण्यासाठी त्यांनी त्यांचे सहकारी विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्यासोबत मिळून डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. यानंतर टिळकांनी दोन वृत्तपत्रांची सुरुवात केली एक म्हणजे केसरी तर दुसरे मराठा.

 

lokmany tilak mahiti in marathi
lokmany tilak mahiti in marathi

 

बाळ गंगाधर टिळक यांचे प्रमुख कार्य (Bal Gangadhar Tilak Major Works In Marathi )

  1. राजकीय करियर (Political Career)

  • सुरुवात (1890-1908)

बाळ गंगाधर टिळक यांनी 1890 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी लवकरच स्वराज्यावर पक्षाच्या संयमी विचारांना तीव्र विरोध करण्यास सुरुवात केली. त्यांनी सांगितले की सरळ संविधानिक आंदोलन इंग्रजांविरुद्ध व्यर्थ होते. यानंतर त्यांना प्रमुख काँग्रेस नेते गोपाळकृष्ण गोखले यांच्याविरुद्ध उभे केले गेले. इंग्रजांना हाकलण्यासाठी त्यांना एक सशस्त्र विद्रोह करायचा होता. लॉर्ड कर्जन द्वारे बंगालची फाळणी केल्यानंतर, लोकमान्य टिळकांनी स्वदेशी आंदोलन आणि ब्रिटिशांच्या विदेशी मालावर बहिष्कार टाकला. पण त्यांच्या या पद्धतींनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) आणि चळवळीतही कटु वाद निर्माण केले.

दृष्टिकोनातील या मूलभूत फरकामुळे टिळक आणि त्यांच्या समर्थकांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी मधील अतिरेकी शाखा म्हणून ओळखले जाऊ लागले. टिळक यांच्या प्रयत्नांना बंगालचे राष्ट्रवादी बिपिनचंद्र पाल आणि पंजाबचे लाला लजपत राय यांनी समर्थन दिले. या तिघांना पुढे लोकांनी लाल-बाल- पाल म्हणून ओळखले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 1907 च्या एका अधिवेशनामध्ये मवाळ आणि जहाल वर्गामध्ये तुंबळ हाणामारी झाली आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही दोन गटांमध्ये विभाजित झाली.

– 1896 च्या आसपास पुण्याजवळ प्लेगची महामारी पसरली होती आणि ब्रिटिशांनी ही थांबवण्यासाठी खूप कठोर उपाय केले. कमिशनर डब्ल्यू सी रँडच्या निर्देशका नुसार पोलीस आणि ब्रिटिश सैनिकांनी लोकांच्या घरावर हल्ला चढवला. व्यक्तींच्या वैयक्तिक पावित्र्याचे उल्लंघन केले. व्यक्तिगत संपत्ती जाळली आणि लोकांना शहराच्या बाहेर तसेच आत येण्यास निर्बंध लावले. टिळकांनी या गोष्टींना प्रखर विरोध केला आणि आपल्या वृत्तपत्रांमध्ये याबाबतीत उत्तेजक लेख लिहिले.

– लोकमान्य टिळकांच्या या लेखामुळे चाफेकर बंधू प्रेरित झाले आणि त्यांनी 22 जून 1897 रोजी कमिश्नर रँड आणि लेफ्टनंट आयर्स यांची हत्या केली. आणि यामुळे टिळकांना हत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली 18 महिने तुरुंगवासाची सजा सुनावण्यात आली.

  • कारावासाची सजा (1908-1914)

– 1908-1914 च्या दरम्यान बाळ गंगाधर टिळक यांना मांडले जेल (बर्मा ) मध्ये सहा वर्षाची कठोर सजा भोगावी लागली. त्यांनी 1908 मध्ये मुख्य प्रेसिडेन्सी मेजिस्ट्रेट डगलस किंग्स फोर्ड च्या हत्येच्या प्रयत्नाला क्रांतिकारी खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांचे खुलेआम समर्थन केले. त्यांच्या कारावासाच्या काळात त्यांनी त्यांचे लेखन चालू ठेवले ज्यामध्ये त्यांनी एक प्रमुख ग्रंथ गीता रहस्य हा रचला.

– लोकमान्य टिळकांची वाढती प्रसिद्धी आणि लोकप्रियता यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्या वृत्तपत्राचे प्रकाशन थांबवण्याचे प्रयत्न केले. बाळ गंगाधर टिळक यांच्या पत्नीचे पुण्यामध्ये निधन झाले जेव्हा ते मांडले जेलमध्ये बंद होते.

  • कारावास नंतर (1915-1919)

– 1915 मध्ये टिळक भारतामध्ये परतले, तेव्हा प्रथम विश्व युद्ध सुरु असल्यामुळे राजकीय स्थिती वेगाने बदलत होती. टिळकांची सुटका झाल्यानंतर अभूतपूर्व आनंद साजरा केला गेला. यानंतर एक नवा दृष्टिकोन घेऊन ते राजकारणात परत आले. आपल्या सहकारी राष्ट्रवादिंसोबत पुन्हा एकदा एकत्र येण्याचा निर्णय घेऊन, टिळकांनी 1916 साली जोसेफ बॅप्टिस्टा, ऍनी बेझंट आणि मोहम्मद अली जिना यांच्यासोबत मिळून ऑल इंडिया होमरूल लीगची स्थापना केली. एप्रिल 1916 मध्ये 1400 सदस्य असलेल्या होमरूल लीग मध्ये 1917 पर्यंत 32000 लोक जोडले गेले.

 

२. वृत्तपत्रांची स्थापना (Newspaper Establishment)

– आपले राष्ट्रवादी विचार प्रकट करण्यासाठी आणि लोकांमध्ये देशभक्ती जागवण्यासाठी टिळकांनी दोन वृत्तपत्रांची स्थापना केली पहिले म्हणजे मराठा (इंग्रजी ) आणि दुसरे केसरी (मराठी ). दोन्ही वृत्तपत्रांनी भारतीयांना गौरवशाली भूतकाळाची जाणीव करून देण्यावर भर दिला आणि जनतेला स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहित केले. या वृत्तपत्रांमुळे स्वतंत्रता चळवळ सक्रिय ठेवण्यास अत्यंत मदत झाली.

– 1896 मध्ये संपूर्ण देशामध्ये दुष्काळ आणि प्लेगची साथ पसरली होती त्यावेळेस ब्रिटिश सरकारने घोषणा केली की घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. सरकारने दुष्काळ निवारण निधी सुरू करण्याला देखील विरोध केला. सरकारच्या या निर्णयाचं दोन्ही वृत्तपत्रांनी कठोर शब्दांमध्ये आलोचन केले. टिळकांनी अगदी निर्भीडपणे दुष्काळ आणि प्लेग हा सरकारच्या पूर्णपणे दुर्लक्षपणामुळे झाल्याचे आपल्या वृत्तपत्रांमध्ये लिहिले.

 

३. समाजसुधारकार्य (Social Reform Work)

स्वतःचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर टिळकांना सरकारी सेवेसाठी वेगवेगळे आकर्षित प्रस्ताव देण्यात आले, परंतु त्यांनी ते धुडकावून लावून राष्ट्रीय चळवळीच्या कार्यामध्ये स्वतःला झोकून दिले. ते एक महान समाज सुधारक होते संपूर्ण जीवनामध्ये त्यांनी महिला शिक्षण आणि सशक्तीकरणाबद्दल समाजामध्ये जागरूकता पसरवली. लोकांनी एक होऊन त्यांच्यामध्ये विचारांची देवाण-घेवाण व्हावी यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंतीची सुरुवात केली.

 

बाळ गंगाधर टिळक यांचा मृत्यू । (Bal Gangadhar Tilak Death )

जालियनवाला बाग हत्याकांड मुळे लोकमान्य टिळक पराकोटीचे निराश झाले आणि त्यांचे स्वास्थ्य बिघडत गेले. स्वतः आजारी असताना देखील टिळकांनी भारतीयांना स्वतंत्रता चळवळ सुरू ठेवण्यास सांगितली. टिळकांना मधुमेह झाला होता. जुलै 1920 मध्ये त्यांची हालत अधिक जास्त खराब झाली आणि अखेर 1 ऑगस्ट 1920 ला त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये दोन लाखहून अधिक लोक सामील झाले होते.

तुम्हाला या लेखामधून, लोकमान्य टिळक निबंध, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती निम्मित भाषण, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, माझा आवडता नेता लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, बाळ गंगाधर टिळक यांचा इतिहास, १५ ऑगस्ट भाषण , speech on lokmanya tilak in marathi, esaay on bal gangadhar tilak in marathi, essay on my favorite leader in marathi for kids, freedom fighter speech in marathi, freedom fighter essay in marathi, lokmany tilak mahiti in marathi याविषयी ची माहिती आवडली असेल तर आमचा हा लेख नक्की लाईक आणि शेयर करा.

Bal Gangadhar Tilak

 

 

मित्र आणि मैत्रीणींनो मी पूजा शिंदे. मला लहान पानापासूनच लिहायला आवडते आणि इंटरनेट वर आल्यावर मला एक गोष्ट समजली कि इंटरनेट वर मराठी मध्ये जास्त कोणी माहिती अपलोड करत नाही आहे. मराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि आपण मराठी असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे म्हणूनच मी या वेबसाईट द्वारे मराठी भाषेचे जतन करण्याचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment